आयोडिनयुक्त मीठ आरोग्यासाठी वरदान; वापराची आहेत ‘ही’ ४ महत्त्वाची कारणेआयोडिनयुक्त मीठ आरोग्यासाठी वरदान; वापराची आहेत ‘ही’ ४ महत्त्वाची कारणे

लातूर प्रतिनिधी:

स्वयंपाकात नियमित वापरले जाणारे मीठ केवळ अन्नाला चवच आणत नाही, तर शरीराला निरोगी ठेवण्यासाठीही मोलाची भूमिका बजावते. युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायजेशन (यूएसआय) शिफारशीनुसार मिठात आयोडिन मिसळले जाते, ज्यामुळे आयोडिनची कमतरता भरून निघते. ‘भारत आयोडिन सर्वेक्षण २०१८-१९’नुसार, सुमारे ७६.३ टक्के कुटुंबे किमान १५ भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) आयोडिन असलेले मीठ वापरतात; परंतु आजही अनेक लोकांना आयोडिनयुक्त मिठाच्या सेवनाचे नेमके फायदे माहीत नाहीत. त्यामुळे आयोडिनच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची प्रमुख ४ कारणे खालीलप्रमाणे आहेत:

१. आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) टाळण्यास मदत:

आयोडिनमुळे शरीरातील आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) टाळण्यास मोठी मदत होते आणि मानसिक विकासासाठी ते अत्यंत सहाय्यक ठरते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व राष्ट्रीय पोषण संस्थेच्या (एनआयएन) शिफारशीनुसार, किशोरवयीन व प्रौढांसाठी १४० मायक्रोग्रॅम, १ ते १२ वयोगटातील मुलांसाठी ९०-१०० मायक्रोग्रॅम आणि गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी २२०-२८० मायक्रोग्रॅम प्रतिदिन आयोडिनचे सेवन आवश्यक आहे.

२. निरोगी गर्भधारणेस मदत:

गर्भधारणेदरम्यान व बाल्यावस्थेत आयोडिनची कमतरता झाल्यास बाळाच्या मेंदूवर आणि बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होतो. आयोडिनच्या अभावामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते तसेच हायपोथायरॉईडिझम होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार गर्भधारणेदरम्यान योग्य प्रमाणात आयोडिन घेणे आवश्यक ठरते.

३. मुलांमध्ये मेंदूच्या विकासास सहाय्य:

मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी, विशेषतः गर्भधारणेदरम्यान आणि लहान वयात मेंदूची वाढ होत असताना आयोडिन अत्यंत महत्त्वाचे असते. गर्भधारणा ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा (पहिले १००० दिवस) काळ हा थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या हार्मोन्समुळे मेंदूतील पेशींच्या निर्मितीला, मज्जासंस्थेच्या विकासाला आणि मज्जातंतूंच्या संरक्षक आवरणाला मदत होते. या काळात आयोडिनची कमतरता झाल्यास मेंदूचा विकास आणि बौद्धिक क्षमता कमी होण्याची शक्यता असते.

४. एकूण आरोग्यास मदत:

आयोडिन हा मेंदूच्या आरोग्यासाठी आणि थायरॉईडच्या चयापचयासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. शरीराच्या एकूण आरोग्यास हे पोषक ठरते. आयोडिनचे प्रमाण कमी झाल्यास थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती घटते, ज्यामुळे शरीराचे चयापचय मंदावते आणि सतत थकवा जाणवतो. योग्य प्रमाणात आयोडिन घेतल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि शरीर निरोगी राहते.

टाटा सॉल्टचे योगदान: भारताच्या आयोडिन कमतरता विकारावरील लढ्यात १९८३ मध्ये सादर झालेले ‘टाटा सॉल्ट’ मोलाची भूमिका बजावत आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय स्तरावर ब्रँडेड आयोडिनयुक्त मीठ असा लौकिक असलेले टाटा सॉल्ट देशभरातील घरांमध्ये विश्वासाचे प्रतीक बनले असून, प्रत्येक कणामधून पोषण पोहोचवत भारताच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत आहे.

संपादक- नेताजी जाधव संपर्क: 9421443771

You cannot copy content of this page

error: Content is protected !!