श्रमिकांचा सन्मान व विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करुन माता रमाई यांची जयंती साजरी.
लातूर प्रतिनिधी : आज दि ०७ फेब्रुवारी रोजी पूर्वभागातील १२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून व महिला स्वच्छता ताईंचा सन्मान करुन माता रमाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती केली साजरी करण्यात आली. शहरातील बालाजी नगर येथे राजा शूध्दोधन बूद्ध विहार या ठिकाणी माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष हिराचंद गायकवाड व प्रमूख पाहूणे म्हणून बलांडे सर, लक्ष्मण कांबळे, ॲड किशोर शिंदे मूख्याध्यापक सौ बालवाड, आरोग्य सेविका सौ गिरी यांची प्रमूख उपस्थिती होती तर प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते तथागत गौतम बूद्ध डाॅ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या फोटोचे पूजन करुन सामूहिक बूद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमूख पाहूण्यांचा राजा शूध्दोधन चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड आनंद सोनवणे यांनी केले तर ॲड किशोर शिंदे, श्री बलांडे व श्री वाघमारे यांनी माता रमाई यांचा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनात किती त्याग केला आहे. या बाबतीत मौल्यवान मार्गदर्शन केले. येथे आमंत्रित असलेल्या म.न.पा.स्वच्छता ताईंचा सन्मान येथील राजा शूध्दोधन महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला. याचबरोबर या परिसरातील १२५ होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला

कार्यक्रम यशस्वितेसाठी राजा शूध्दोधन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष ॲड आनंद सोनवणे, विक्रम चिकाटे, सूर्यवंशी गौतम, दांडे सूर्यकांत, राजकूमार राऊत, धम्मरत्न सोनवणे, हेमंत जाधव, विशाल कांबळे, दगडू साळवे, सूभाष सोनकांबळे, कपिल डबडे, संघपाल दांडे, रामराव सोनकांबळे, महिला मंडळाच्या सूनिता उबाळे, आशाबाई सोनवणे, शारदा दांडे, रतनबाई गायकवाड, सूर्यवंशी ताई व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.