भैय्यासाहेब अतिरिक्त निधी देऊ नका हो! हे अधिकारी या फंडावर डल्ला मारण्याच्या मानसिकतेत ?
छञपती शिवाजी महाराज चषक राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन थाटात; अधिकारी सुटा बुटात
उद्घाटन कार्यक्रमासाठी १७ शाळांना प्रत्येकी ५०० विद्यार्थ्यी आणण्यासाठी शिक्षण विभागाची जाचक अट; रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ.

लातूर प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्यंत उत्साही वातावरणात खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकवून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले. राज्यातील ३२ संघातील ४४८ खेळाडू, १५० तांत्रिक समिती सदस्य सहभागी आहेत. या उद्घाटन समारोह प्रसंगी आमदार अभिमन्यु पवार यांनी पाच लाख रुपयांची मदत केली असल्याचे सांगीतले तर पुढील फंडासाठी आमदार अमित देशमुखांनी पुढाकार घ्यावा माझ्याकडे एवढाच फंड असल्याचे सांगीतले आणि एकच चर्चा होवू लागली. आमदार अमित देशमुखांनी ही आपल्या देशमुखी शैलीत स्पर्धेसाठी जो काही निधी लागेल तो मि देतो अशी ग्वाही दिली खरी परंतु भैय्यासाहेब अतिरिक्त निधी देऊ नका हो! हे क्रिडा अधिकारी या फंडावर डल्ला मारण्याच्या मानसिकतेत आहेत. असा एकच सुर प्रेक्षक, खेळाडु आणि लातूरकरांतून निघताना स्पर्धेच्या ठिकाणी दिसत होता. ७५ लाख महाराष्ट्र शासनाचा निधी, आमदार अभिमन्यु पवार यांच्याकडून ५ लाख, लातूर महानगरपालिका यांच्याकडून ५ लाख व आता माजी पालकमंञी तथा आमदार अमित देशमुख यांच्याकडून उर्वरित खर्च म्हणजे “अधिकारी तुपाशी स्वयंसेवक, पंच आणि संघटना उपाशी” अशिच गत म्हणावी लागेल.

कारण जिल्हा क्रीडा अधिकारी व विभागीय क्रीडा अधिकारी या पैशाचा उपयोग भलतीकडेच करुन गायब करण्याच्या मानसीकतेत दिसत असल्याची जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंच्या स्वागतासाठी विद्यालय व महाविद्यालयांनी त्यांच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर स्वागत होर्डिंग व कमानी उभारून स्पर्धेचा उत्साह वाढवावा तसेच स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास शहरातील १७ शाळांनी प्रत्येकी ५०० विद्यार्थी उपस्थित ठेवण्याचे आदेश लातूर शिक्षणविभागाचे शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना काढल्याने शाळा व शिक्षकांमधे प्रचंड नाराजगी दिसत आहे. त्यांचे असे झाले कि तोंड दाबुन बुक्कांचा मार अगदी निमुटपणे सहन करायचा पण त्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या निर्दोष छोट्या विद्यार्थ्यांचे काय त्यांच्या शाळेपासून क्रीडा संकुलापर्यंत चालत प्रचंड रहदारीचा रस्ता ओलांडताना आपला जिव मुठीत धरुन क्रीडा शिक्षक आणि विषय शिक्षकांची घालमेल कोणाला समजणार.

दरम्यान या स्पर्धेच्या पंधरा दिवस आधीपासून स्पर्धेची तयारी सुरु आहे. या स्पर्धेचा उस्ताह वाढावा म्हणून सर्व कामात जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या शेकडो आजी माजी खेळाडूंनी सराव आपली वैयक्तिक व्यवसाय नौकरीला रजा घेत सहभाग नोंदवला पण यांना स्वयंसेवक म्हणत अक्षरशः राञंदिवस मजुरासारखे राबविण्यात आले आहे. त्यांनी खेळासाठी योगदान दिले खरे पण हे पैसे वाचवुन कोणाच्या घश्यात जाणार आहेत हे लातूरकर जाणूनच आहेत. क्रीडा संकुलात प्रवेशद्वारावर प्रवेशासाठी हप्ता वसुलीसारखी वसुली केली जाते पण संकुलात येणार्यांच्या दररोज गाड्या चोरीला जातात. कॅमेरे असुन सुद्धा ते झाडांच्या पानाखाली झाकून गेले आहेत त्यामुळे पोलीसांना चोराला शोधणे सुद्धा कठीण झाले आहे. संकुलावर लाईट बंद पडली तर दोन दोन महिने सुरु होत नाही. ट्रॅकवर धुळिचे साम्राज्य झाले आहे. संकुल स्वच्छ राहत नाही. संकुलाच्या मुतार्या इतर सेवाभावी संस्थेला निटनिटके ठेवण्यासाठी दत्तक घ्यावे लागतात याहून लाजिरवाणी गोष्ट कोणती असु शकते. संकुलात बिनधास्त तळिराम आपला टेबल मांडुन बसतात. त्यांना साध कोणी विचारत नाही आणि शिकवणी वर्गासाठी लातूरात दाखल झालेले लव्ह बर्ड तर संकुलाचे लव्ह पॉईंट करुन ठेवले आहेत. याकडे लक्ष द्यायला संबंधित वरिष्ठ कार्यालय सपशेल फेल ठरत आहे आणि पुन्हा तुम्ही भैय्यासाहेब उर्वरित खर्च उचलण्याची जबाबदारी घेत आहात यामुळेच खेळातही पॅटर्न करणार्या लातूर ला आता शिस्तीची गरज आहे. म्हणूनच “भैय्यासाहेब अतिरिक्त निधी देऊ नका हो! हे अधिकारी या फंडावर डल्ला मारण्याच्या मानसिकतेत आहेत” असाच काहिसा सुर जाणकार प्रेक्षकांतून ऐकायला मिळत होता.



