सरल ॲप नोंदणीमधे लातूर मराठवाड्यात पुढे- खासदार श्रृंगारे
लातूर दि 28 जुन देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्ष पुर्ण झाले आहे यासाठी राबविण्यात आलेल्य विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत सरल ॲप नोंदणीच्या उपक्रमामध्ये आपल्या लातुर जिल्ह्याचा मराठवाडा विभागात पहिला क्रमांक असून हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत आणि समर्पक कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे असे गौरवोद्वार खासदार सुधाकर शृंगारे यांनी विश्व पॅलेस, लातूर येथे आयोजीत लाभार्थी संमेलनात बोलताना काढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाला ९ वर्ष पुर्ण झाले आहे त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध योजनेतील लाभार्थ्याचे संमेलन उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार तिरथ सिंह रावत, मध्यप्रदेश पर्यटन बोर्डाचे अध्यक्ष विनोद गोटीया यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री तथा अहमदपुर विधानसभा प्रमुख विनायकराव पाटील, माजी आमदार उदगीर विधानसभा प्रमुख सुधाकर भालेराव, जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सचिव प्रा. किरण पाटील, लोकसभा प्रचार प्रमुख दिलीपराव देशमुख, होते.. प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, बब्रुवान खंदाडे, धर्माजी सोनकवडे, प्रदेश भाजपचे शैलेश लाहोटी, लातूर विधानसभा प्रमुख तथा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, निलंगा विधानसभा प्रमुख दगडु साळुंके, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. भाग्यश्री क्षीरसागर, विक्रम काका शिंदे, संजय दोरवे, रामचंद्र तिरुके, त्र्यंबकआबा गुट्टे, अमोल पाटील, बापुराव राठोड, सतीश आंबेकर, भागवत सोट, बालाजी गवारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच या लाभार्थी संमेलनास जिल्हा भाजपचे सर्व लोकप्रतिनीधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात लाभार्थीही उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, भाजप हा घराणेशाहीचा पक्ष नसुन आपल्या सर्वसमान्य कार्यकत्यांच्या विचारांचा आणि शेतकरी, कष्टकरी, वारकऱ्यांचे हीत जोपासणारा पक्ष असल्याचे खासदार शृंगारे यांनी सांगीतले. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या विविध योजनेचे लाभ आपण सर्वजन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या लाभार्थी आहोत आणि येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्ता होण्याच्या दिशेने निश्चितच अत्यंत प्रभावीपणे मार्गक्रमण करत आहे असेही खा. शृगारे यांनी सांगितले.