संघर्षशील नेतृत्व आ. रमेशअप्पा कराड नीती विकासाची! बांधिलकी समाजाची !!
लातूर ग्रामीण मतदार संघ हेच माझे कुटुंब या भावनेतून काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी, शेतमजूरांच्या घामाचे मोल झाले पाहिजे; सर्व सामान्यांना, गोरगरीबांना त्यांचा न्यायहक्क मिळाला पाहिजे यासाठी आवाज उठवून सतत संघर्ष करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड हे जनसामान्यांच्या मनातील संघर्षशील नेते निर्माण झाले आहेत. राजकीय युद्धात धनशक्ती विरुद्ध लढताना दोन वेळा पराभव झाला तरी खचून न जाता त्याच उमेदीने पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून सामान्यांच्या हितासाठी कार्यरत राहिल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत बहाद्दर मतदारांनी ग्रामीण मतदारसंघात नवा इतिहास घडवून रमेश आप्पांना विधानसभेत पाठविले. या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनतेनी जनहितासाठी नेता निवडला. आतापर्यंत त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून गोरगरीब सर्व सामान्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला. मतदार संघातील गावागावात वाडीवस्तीत विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी मिळवून दिला. सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी निर्माण करुन मानसन्मान मिळवून दिला ग्रामीण भागाच्या विकासाची नीती असणारे आणि समाजाशी बांधिलकी ठेवणाऱ्या अशा या अष्टपैलू संघर्षशील नेतृत्वाचा आज जन्मदिवस. राजकिय, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य त्यांच्या हातून यापुढील काळातही अखंडपणे होत राहील हीच यानिमित्ताने सदिच्छा !!!…… चंद्रकांत कातळे, रेणापूर.

कोणतीही जात किंवा धर्म माणुसकीपेक्षा मोठा नाही. जातीपातीने कोणाचेही भले झाले नाही वसुधैव कुटुंबकम् या सुत्रानूसार गोरगरीब सर्व सामान्य जनतेसाठी, शेतकरी, शेतमजूर, दिन दुबळ्यांसह कष्टकऱ्यांसाठी विविध प्रश्नावर लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी संघर्ष केला. स्व. मुंडे साहेब यांची काम करण्याची पद्धत सर्व सामान्यांसाठी संघर्ष करण्याची धमक आणि ग्रामीण जनतेशी कायम ठेवलेली नाळ, या कामावर प्रभावित होऊन त्यांच्या संघर्षाचा वारसा घेवून शेतकरी कुटुंबात जन्मलेले रमेशअप्पा कराड यांनी आपल्या भागात राज्यकर्त्याकडून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची होत असलेली लूट फसवणूक पाहता या समाजाचे काही देणे लागतो ही कर्तव्याची भावना मनात ठेवून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे काम सुरु केले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी रमेशअप्पा कराड यांच्यावर दिली. लातूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात भाजपाचे काम करणे तसे अवघडच होते, मात्र जिद्दीने जोमाने जिवाभाचे कार्यकर्ते निर्माण करुन त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन प्रस्थापित शक्ति विरुद्ध सतत संघर्ष करत त्यांनी भाजपाचे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. लातूर ग्रामीण या मतदार संघात मेहनतीने कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करुन भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आ. रमेशअप्पा यांची जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी अनेकवेळा अनुभवायला मिळाली. मागील दोन विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले मात्र कधीच खचले नाही. “खचले ते आप्पा कसले” पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा त्याच उमेदीने गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी कार्यरत राहीले. अडीअडचणी सोडवू लागले याचा परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आणि धनशक्ती एकाधिकारशाही हुकूमशाही विरुद्ध आवाज उठवून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात नवा इतिहास घडवला रमेश आप्पांना विधानसभेत पाठवले. हक्काचा आमदार निवडून आणला. खऱ्या अर्थाने जनतेने जनहितासाठी नेता निवडला असे बोलले तर वावगे ठरणारे नाही.

काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना, शेतमजूरांना कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्या घामाचे मोल झाले पाहिजे गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी सोयाबीन अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई, पिकविमा, दुष्काळी मदत वेळोवेळी विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, मेळावा घेवून सरकारला धारेवर धरुन संघर्ष केला आणि न्याय हक्क पदरात पाडून घेतला. मांजरा कारखान्याच्या दारात परिवाराच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे गाळप केलेल्या ऊसाला भाव मिळावा यासाठी मांजरा कारखान्याच्या दारात आ. रमेशअप्पा कराड यांनी केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या एफआरपी नूसार भाव मिळाला.
गेल्या पंधरा-वीस वर्षात आ. रमेशअप्पा कराड यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. पक्षाच्या वतीने दिलेले कार्यक्रम प्रत्येक वेळी यशस्वी केले. मागील काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, रेणापूर नगर पंचायत यासह विविध निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून काँग्रेस पुढाऱ्यांना धुळ चारली आणि सामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे मिळवून दिली. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडून येण्याची परिस्थिती असताना युतीच्या जागा वाटपात ठाकरे सेनेने सौदा करून ही जागा स्वतःकडे घेतली तर निवडून येण्याची क्षमता नसल्याने काँग्रेस पुढाऱ्यांनी सौदा करून मतदारसंघ विकण्याचे पाप केले. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता काँग्रेसची ही नीती सर्वसामान्य ओळखली आणि तीस हजार मते नोटाला देऊन नवा उच्चांक केला. विक्रमी नोटाच्या मताची दखल घेऊन आणि आजपर्यंत केलेल्या सर्व कामाची दखल घेवून भाजपा पक्षश्रेष्ठीने रमेशअप्पा कराड यांना विधानभवनात काम करण्याची संधी दिली. रमेशअप्पा आमदार व्हावेत ही गोरगरीब, सर्व सामान्यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली. प्रत्येकाला आपल्या हक्काचा माणूस आमदार झाला याचा प्रत्यय प्रत्येकाला अनुभवायास मिळाला. आमदार झाले म्हणून आप्पांमध्ये कुठलाच बदल झाला नाही, बडे जावपणा दिसला नाही. सर्वांना सहजतेने उपलब्ध होणारे आप्पा, खरोखर हक्काचा आमदार रमेशअप्पाच्या रूपाने सर्वसामान्यांना मिळाला आहे.

केंद्रशासन आणि राज्यशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीतील विविध गावच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर करून आणला. या निधीतून गावागावात अंतर्गत रस्त्यांची कामे, नाली बांधकाम, जल-जीवन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, सभागृह, समाजमंदिर, सभागृह, विविध गावातील धार्मिक स्थळांच्या विकास योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्मशानभूमी शेड, नदी नाल्यावर पुलांचे बांधकाम, शेतरस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते, कंपाऊंड वॉल, शादीखाना यासह अनेक कामांना मंजूरी मिळवून घेतली. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत हे खुप दिलासादायक आहे. मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीत आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून विविध मंदिरासमोर बांधण्यात आलेले सभागृह गावकऱ्यांना लक्षवेधी ठरत आहेत. येत्या काळात निश्चितपणे आ. रमेशअप्पा कराड यांच्या हातून विधायक कामे होतील यात शंकाच नाही. कोरोनाच्या संकट काळात आ. रमेशअप्पा कराड यांनी अनेक रुग्णांना मोठा दिलासा दिला, गरजूंना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविली. लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयास सुसज्ज रूग्णवाहिका दिल्या. मतदार संघातील आशा सेविकांसह विविध कोरोना योध्दांना वेळोवेळी सन्मान करून प्रोत्साहन दिले. एकुणच कोरोना काळात आ. कराड यांनी केलेले काम कोणीही कधीही विसरु शकत नाही.
लातूर ग्रामीण मतदारसंघ हेच माझे कुटुंब या भावनेतून काम करत असताना रमेशअप्पांनी शासनाचा विकास निधी मिळवूण देताना, जनहिताच्या विकासाच्या योजना मंजूर करताना गावागावात, वाडीवस्तीत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. वैयक्तिक लाभाच्या योजना संपूर्ण मतदार संघात मोठ्या प्रमाणात गरजु लाभार्थ्यांना मिळवूण दिल्या, या ज्याला गरज आहे, जो गरजवंत आहे आणि ज्याच्यासाठी योजना आहे अशांना शासनाच्या योजनांचा लाभ देवून मोठी मदत केली आहे. या सर्व योजना राबवत असताना जात, धर्म, पंथ, गटतट असा भेदभाव केला नाही यातून “वसुधैव कुटुंबकम्” याचा प्रत्यय दिसून आला.

आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे, गोरगरीब सर्व सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे, गरजुंना वेळोवेळी मदत करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यश आले म्हणून कधीच उन्मत झाले नाहीत तर अपयश आल्याने कधीच खचून गेले नाहीत. गोरगरीब जनतेला, अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे हे तर रमेशअप्पांच्या आवडीची कामे आहेत. अनेकांना शिक्षण, आरोग्य, क्रिडा, उद्योग व्यवसायासाठी मदत करून आधार दिला. मदत करताना कोण कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे. याचा किंचीतही विचार न करता स्वतःच्या खिश्यातून अनेकांना मदत करणारे आ. रमेशअप्पा कराड हे खरोखरच आधारवड आहेत. राजकारण आणि त्यातून मिळालेली पदे स्वताःसाठी नव्हे तर समाजाला उभे करण्यासाठी, अडचणीत, संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी आहेत. याची जाण आणि भान ठेवून राजकारण समाज संपन्नतेसाठीच आहे हे तत्व अंगीकारून भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी समाजसेवेचे ओझे अखंडपणे वाहून नेत आहेत. सातत्याने अनेकांच्या डोळ्यातून अश्रू पुसण्याची कम करणारे जनसामान्याचे आधारवड आ. रमेश आप्पा कराड यांचा आज 30 मे रोजी जन्मदिवस या निमित्ताने मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आप्पासाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य कायम पणे अखंड घडत राहो हीच आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना……!!!
चंद्रकांत सूर्यकांत कातळे
भाजपा लातूर.
