लातूर येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत कंपाउंड धनुर्धर अदिती, ओम व सम्यकने पटकाविले सुवर्णपदकलातूर येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत कंपाउंड धनुर्धर अदिती, ओम व सम्यकने पटकाविले सुवर्णपदक

लातूर येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत कंपाउंड धनुर्धर अदिती, ओम व सम्यकने पटकाविले सुवर्णपदक

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा लातूरकरांनी अनुभवला धनुर्धरांनी धनुष्यातून सोडलेला बाणाचा वेग.

लातूर : लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा संघटनेच्या वतीने लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित सब ज्युनिअर वयोगटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी धनुर्धरांनी धनुष्यातून सोडलेल्या बाणाचा वेग लातूरकरांनी अनुभवाला. कंपाउंड राउंड प्रकारात आपल्या धनुर्विधेची शैली दाखवत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेची मैदाने दणाणून सोडणारी महाराष्ट्राची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी साताऱ्याची अदिती स्वामी, साताऱ्याचा ओम कदम आणि नागपूरचा सम्यक मेश्राम यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. कंपाउंड राउंड प्रकारातील विजेत्या खेळाडूंचे पदक वितरण भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऍड गणेश गोमचाळे, व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रहास मेटे, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब चाकूरकर, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, क्रीडा अधिकारी दत्तात्रय गडपल्लीवार, कृष्णा केंद्रे, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे खजिनदार रंगराव साळुंके, कॉम्पिटेशन म्यानेजर प्रविण गडदे, डायरेक्टर ऑफ शूटिंग लक्ष्मीकांत खिची, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे, सचिव अशोक जंगमे, कोषाध्यक्ष शिवाजी आळणे, सहसचिव राजेश देवकर, लक्षमीकांत जोगदंड आदींच्या हस्ते करण्यात आले.

कंपाउंड राउंड प्रकारचा अंतिम निकाल अनुक्रमे, प्रथम, द्वितीय, व तृतीय प्रमाणे मुलांमध्ये ५० मी डिस्टन्समध्ये वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये ओम कदम ( सातारा ), अजित गायकवाड ( सोलापूर ), मानव जाधव ( बुलढाणा ), ५० मी डबल डिस्टन्स ओव्हर ऑल मध्ये सम्यक मेश्राम ( नागपूर ), मानव जाधव ( बुलढाणा ), ओम जाधव ( सातारा ), टिम एलिमिनेशन मध्ये सातारा, नागपूर, बुलढाणा तर मुलींमध्ये ५० मी डिस्टन्स मध्ये वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये अदिती स्वामी ( सातारा ), आर्या प्रसाद ( पिंपरी चिंचवड ), रेश्मा वाबळे ( पुणे ), ५० मी डबल डिस्टन्स ओव्हर ऑल मध्ये अदिती स्वामी ( सातारा ), आर्या प्रसाद ( पिंपरी चिंचवड ), ऋतुजा कसल ( अहमदनगर ), टिम एलिमिनेशन मध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व जालना आणि मिक्स इव्हेंट मध्ये ओम कदम व अदिती स्वामी ( सातारा ), सम्यक मेश्राम व सिद्धी नागुलवार ( नागपूर ), आर्या पवार व आर्या प्रसाद ( पिंपरी चिंचवड ) असे धनुर्धरांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कॉम्पिटेशन म्यानेजर प्रवीण गडदे, स्पर्धा संचालक शुभांगी दळवी, मुख्य पंच प्रतीक थिटे, स्पर्धा डायरेक्टर ऑफ शूटिंग लक्ष्मीकांत खिची, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सहसचिव राजेश देवकर, हणमंत केसरे, नवनाथ गरगटे, भास्कर तामटे, सूर्यकांत साळुंके, नितीन डांगरे आदींसह जिल्हा धनुर्विधा संघटनेचे पदाधिकारी व धनुर्धरांनी परिश्रम घेतले. दरम्यान महाराष्ट्राची शान असलेले अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत भरीव कामगिरी देत राज्याच्या व देशाच्या नावावर पदके पटकाविणारे या स्पर्धेत सहभागी झालेले आंतरराष्ट्रीय धनुर्धर अदिती स्वामी, मंजिरी अलोणे आणि मानव जाधव यांचा लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे व सचिव अशोक जंगमे यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!